Saturday, 24 December 2011

छत्रपती शिवाजी महाराज की जय .........


छत्रपती शिवाजी महाराज की जय .........फक्त जय म्हणून काय होणार....  हीच वेळ आहे काही तरी करून दाखवायची ........... मातीत मरणारे कैक असतात ,पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात...!!! आजचा वर्तमानकाळ आपल्याला सांगतो तरी काय ?? इतिहासाच्या पुस्तकामधील शिवाजी महाराजांच्या गाथा वाचाव्या,ऐकाव्या,पाहाव्या आणि उत्तरपत्रिकेत लिहाव्या आणि मार्कांचे धनी व्हावे एवढच..??? शिवजयंतीच्या निम्मित्ताने राजेंची मिरवणूक काढावी,जयजयकार करावा ,गुलाल उधळावा फक्त एवढच ??? याच्या पलीकडे आमच्याकडे काय झाल..!! महाराष्ट्राची अस्मिता आता आहे तरी कुठे ?? आजच्या वर्तमानकालीन जगण्याला राजेंचा महाराष्ट्राला कुठला अर्थ देता येईल ?? आता एखादा तानाजी ,आता एखादा बाजी ,आता एखादा मुरार बाजी का भेटत नाही कुठ आता ?? इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीने समोर जाणारा साम्हजी का भेटत नाही कुठ आता ?? दुष्मनाचे हत्यार वार काळजावर झेलता झेलता स्वराज्यासाठी स्वताला दफन करून टाकणारा एकेक छावा का उभारत नाही इथ आता ?? कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर लखलखत दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा भेटत नाही कुठ आता .......!! आता गाड्या भरपूर आल्या तवेरा आली,बोलेरो आली ,स्कोर्पिओ आली,आल्तो आली,इंडिगो आली पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव का दिसत नाही आता ??? आता बागायतदार भरपूर आले पण कांदा मुळा भाजी ,अवघी मिठाई माजी म्हणणारा सावतामाळी कुठल्या शेतात गवसत नाही आता ........!! राजे कैक झाले पण रयतेच्या डोयिवर सुखाचा छत्र धरव यासाठी स्वताच्या आयुष्याचा रणकंदन करणारा राजा शिवाजी भेटत नाही कुठ आता............!!!!! अब्जोवधी ,करोडपती खूप झाले इथ पण एक फुट्क घाडग आणि एक झाडू ज्याची एस्तेत पण गावागावाना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारा गाडगे बाबा कुठ दिसत नाही आता ......!! आता तुकड्या तुकड्यात जगणार आम्ही पण समाजाला पूर्णत्व बहाल करणारा संत तुकडोजी दिसत नाही आता.....!!! आमची पोर रशिया,चीन ,आफ्रिका ,अमेरिका ला जाऊन येतात पण माज्या भारतीय संस्कृतीचा पताका खांद्याला घेऊन अमेरिकेच्या शिकागोच्या धर्मापरीश्ध्ये मध्ये माज्या संस्कृतीचा तेजोमय निर्माण करणारा विवेकानंद बोलत नाही कुठ आता .........!!!!!! आता देवी खूप झाल्या पण समाज्याला पुण्य बहाल करणारे पुण्यश्लोक आहिल्यादेवी कुठ दिसत नाही आता.......!! आता घराघरात आया आहेत पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ दिसत नाही कुठ आता ............???? ...................म्हणजे माणसं तर काल हि जन्माला येत होती माणसं आज हि जन्माला येत आहेत ....माणसांची गर्दी काल हि होती माणसांची गर्दी आज हि आहे ....पण कालच्या गर्दीत माणसं होती पण आजच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतात हि आमची सगळ्यात मोठी अडचण आहे...................!!!!!! मग आमच्या महाराष्ट्राची कूस वांज झाली कि काय ....???? या सगळ्या गोष्टीना आपणच कारणीभूत ठरलो आहोत.........आणि आपणच ठरत राहतो......!!! एक काळ असा होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पैक होतो आता श्वान संस्कृतीचे पैक झालो आहोत..........!!!!! पूर्वी आमच्या घरावर पाटी असायची "अतिथी देवो भवं ..!!!" पण आता ती पाटी बदलून त्या ठिकाणी दुसरी पाटी लागली आहे "कुत्र्या पासून सावधान..........!!!!" महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ........इतर प्रांतांना भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे...........!! मराठे जन्माला येतात तर संघर्ष करायला जन्माला येतात आयता त्यांना इथ काही मिळाल नाही ........... महाराष्ट्रात जन्माला आला न म्हणजे खांद्यावर संकट घेऊनच पैदा झाला ............!! एकीकडे मेजवानी झाडणारी माणसं ,तर एकीकडे कुपोषणात मारणारी माणसं ......... एकीकडे गाड्यांची रेलचेल,तर एकीकडे पायात एक तुटका वाहन नाही .......... एकीकडे फटाके वाजवून दिवाळी साजरी होते तर दुसरीकडे त्यांच्या फटक्यावर आवाज.....!! हे शिवाजी महाराज्यांच स्वराज्य आहे का ??? राजेंनी स्वराज्य निर्माण केल पण आम्ही सुराज्य नाही .......... एकीकडे लचके तोड चाललेली ,कुणी विदर्भ वेगळा मागायचा ,कुणी बेळगाव सीमा भाग आमचा म्हणायचा........तुकड्या तुकड्यांचे सारे पुजारी सारे ...........!! अरे ........!! मागायचा तर मागायचा अखंड हिंदुस्थान मागा ना ..............!!!!!!! चत्कोराची भूक काय कामाची............???? या सगळ्या गोष्टीना आपणच कारणीभूत आहोत............!!! मग पुन्हा एकदा मनात येते राजे तुम्ही नाही आहात तेच ठीक आहे............!! जर वाटलंच यायचा तर एक काम करा राजे.............येताना मां साहेब जिजाऊ ना घेऊन या. जय शिवराय 
आंतरजालावरून साभार

No comments:

Post a Comment