दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!
दिवाळीसाठी सगळ्या पणत्या सजल्या सवरल्या होत्या
त्या एक साधी पणती होती..... तपकीरी रंगाची
ना रंग , ना आकर्षण... बाकीच्या पणत्यांच्या तुलनेत अगदी साधी
दिवाळीच्या दिवशी सगळ्या पणत्या एका जागेवर आणून त्या पेटवल्या
मग सगळ्या पणत्यांना व्यवस्थीतपणे त्यांच्या जागेवर रचले गेले...
कुणाला देवघराजवळ, कुणाला तुळशीजवळ, कुणाला रांगोळीत ........
पण त्या तपकीरी पणतीला मात्र घरामागे एक पडलेला भाग होता तेथे नेवून ठेवले
तेथे ना आडोसा होता ना जळते आहे का विझली हे पहायला कुणी...
त्या पणतीला फार वाईट वाटले... तीच्या सोबतच्या पणत्या बद्द्ल असूया वाटली..
आपल्या नशीबाचा राग आला तीला.....
ती जळत आहे का उजळत आहे हेचं तीला कळेनासे झाले....
तीथे बाजूला एक केरसुणी होती ती केव्हा पासून पणतीचे निरीक्षण करत होती..
ती म्हणाली " काय झाले ग " पणतीने सगळी हकीकत सांगीतली
ती न राहून तीला म्हणाली " तुला नाही वाटत का तु चुकीचा विचार करत आहे "
"कसे काय बरं ...?" पणतीने विचारले
केरसुनी म्हणाली " अरे तुझ्या सोबतच्या पणत्या जेथे जळत आहे तेथे त्या जळून काहीचं उपयोग नाही
कारण तेथे उजेड आहे म्हणून त्यांचे वेगळे असे अस्तित्व नाही आहे तेथे ना त्यांची तेथे गरज आहे
पण तु जेथे जळत आहे येथे फक्त तुझेचं अस्तित्व आहे ... खरा प्रकाश तु देत आहे...."
येथे तुझ्या प्रकाशाची गरज आहे ....अरे तु ज्यासाठी आहे तु तेचं करत आहे
तुझा खरा उपयोग होत आहे............. "
पणतीने आसपास पाहीले सारे काही प्रकाशमान होते...
ती हसली आणि परत जळाय ऐवजी आनंदाने उजळून निघाली....
आपले ही असेचं काही असते.........
काय वाटते तुम्हाला ?????????
विचार करा...........
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!
तुमचे पण जीवन अंतरीच्या उर्जेने उजळून निघो ......
हिचं सदिच्छा.............!
आंतरजालावरून साभार
No comments:
Post a Comment