Friday, 18 November 2011

आपली माणसे

जवळच वृद्धाश्रम आहे पण कधीच तिकडे जाण्याचा विचार हि मनात आला नव्हता आला नव्हता..कविता अशीच जमणार नाही म्हणून मग मी विचार केला लिहायचे असेल तर खरेच त्यांची कथा व्यथा जाणून घेतली पाहिजे ;म्हणून मग मी आतमध्ये गेले.तिथे एक आजी बसलेल्या दिसल्या ,मी त्यांचाशी बोलण्याचा प्रयत्न केला... . आजी जेवण झाले का? नाही ग पोरी मला नाही जाणार आज जेवण ........ पण कसे काय आज या आजीबाई कडे केले येणे.... माज्या म्हातारी शी बोलायला वेळ नसतो कोणाला इकडे ... कधी तरी फोन ची रिंग वजते इकडे ... हेल्लो हेल्लो मनी ऑर्डर पोहचली का?.. म्हणून फोन बंद पडतो ...अन डोळ्यातील अश्रू गालावर पोहचून कंठ दाटतो .... . पुन्हा मी म्हणाले आजी थोडसे तरी खाऊन घ्या... नाही ग पोरी मला नाही आज जाणार जेवण .... माझ्या लेकाचा आज वाढदिवस आहे... मन माझे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तडपते आहे .... मन त्याचे का माज्यापर्यंत येण्यासाठी अडवत आहे.. पूर्वीसारखे दिवस नाही राहिले आता.. म्हणून प्रेम माझे त्याचाव्रचे अजूनही संपले नाही.... पूर्वीसारखी मन तक्रार नाही करत आता.. म्हणून तो मला घेऊन जाईल विचार करणे अजूनही सोडले नाही ... . थोडा वेळ डोळ्यातले अश्रू पुसत स्तब्ध शून्यात बघत राहिल्या.. लहानपणी एक घास चिऊ चा एक घास कौऊ चा करत घास भरवायचा.. आयुष्यभर एक एक पैसा जपून वापरायचा.. हौस होतीना लेकाला डॉक्टर बनवायचा.. आता रोज एक च विचार करायचा.. एकदा तरी माझ्या पिल्लाला आमची आठवण येते का? एकदा तरी माज्या पिल्लाला आमची काळजी वाटे का? पण अपेक्षा नी आता कसली,इछाच नाही आता उरली.. आई बापांची किंमत नाही ज्याने केली..मजबुरी त्याने सांगितली.. आपली माणसे ज्याला अडगळ वाटली ...आपली माणसे त्याला परकी झाली. .... थोडेसे रागवत.. तुज्या बाबांना मात्र तुज्यावर राग आहे बरे का ,,' आपल्या आईला का कोणी असे वेगळे करते , रक्ताच्या नात्याला का कोणी क्षणात परके करते,, नाही आठवत का रे तुला आम्ही घेतलेले कष्ट..? बरे आहे न सगळे तिकडे? कसे काय फोन विचारायचं नुसते.. इथे सर्वे काही ठीक आहे ,मजेत आहे बाळा .. तू मात्र सुखी रहा ,आनंदात राहा नेहमीच आशीर्वाद असतील बाळा.. फक्त एकच गोष्ट आहे.. आपल्या माणसाच्या प्रेमापासून तू मुकला आहेस.. आपली माणसे कोण ते आता आम्हाला हि उमजले आहे..

आंतरजालावरून साभार

No comments:

Post a Comment