Saturday, 15 September 2012

समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र

http://keshuji-kbj.blogspot.in/


समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र

समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र. यात ते अफजल खान विजापूरहून स्वारी करण्याकरता निघत असल्याची स्पष्ट सूचना देतात.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
रहाटोची नये ।। १ ।।

चालू नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।। २ ।।

रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।। ३ ।।

आदिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।। 4 ।।

(पत्राच्या प्रत्येक ओवीचरणाचे अद्याक्षर घेतल्यास 'विजापूरचा सरदार निघाला आहे' ही सुचना मिळते.) खान निघाल्याची खबर देणारे हे पत्र असा इतिहासाचा भाग काही काळ बाजुला ठेवून जर ह्या ओळी पाहिल्या तर आपल्यापैकी प्रत्येकालाच एक वेगळा संदेश, उपदेश देणारे असे हे चरण आहेत असे जाणवते..

मद, मोह, मत्सरादी षड-रिपूंचे हे खान आपल्यावर नेहमीच चाल करुन येण्यास सज्ज असतात.. आपल्यातच वास करुन असतात. अन संधी मिळताच आपल्याच सद्सदविवेकावर घाला घालतात. आपल्यातल्याच सद्गुणांच्या मंदिरांचे कळस मोडून टाकतात.

No comments:

Post a Comment