प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे...
एक दिवस एक साधू नदीवर स्नानास गेला होता. स्नान घेत असताना त्यास एक विंचू पाण्यात पडून गटांगळ्या खाताना दिसला. त्या विंचवास पोहता येत नव्हतं. जीव वाचविण्यासाठी तो करीत असलेली केविलवाणी धडपड पाहून साधूचं मन दवलं. त्याच्या मनात विचार आला, जर आपण विंचवास वाचविले नाही, तर तो नक्कीच बुडणार. त्यामुळे साधूनं त्या विंचवास अत्यंत काळजीपूर्वक उचलून पाण्याबाहेर काढलं आणि नदीच्या काठावर नेऊन खाली जमिनीवर सोडणार तोच त्या विंचवानं साधूच्या बोटाला नांगी मारली. साधूला असह्य वेदना झाल्या, त्यानं एकदम हात झटकला, विंचू जमिनीवर पडला. साधूनं सुटकेचा नि:श्वास सोडला आणि पाण्यात शिरून स्नान घेऊ लागला, थोड्या वेळानं त्याचं लक्ष पुन्हा विंचूच्या दिशेनं गेलं, त्याला दिसलं की, विंचू जमिनीवरून परत एकदा नदीच्या दिशेनं जाऊन पाण्यात पडून धडपडू लागला आहे. साधूला पुन्हा त्याची कीव आली. त्यानं त्यास पुन्हा उचलून पाण्याबाहेर काढलं, आणि पुन्हा तेच, विंचवानं साधूच्या हाताला नांगी मारली... असं हे नाट्य काही मिनिटं चालू होतं.
पाण्यावर येणारी शिकार टिपण्यासाठी तेथून जवळच झाडावर दबा धरून बसलेला शिकारी हे सर्व नाट्य पाहत होता. साधू त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय आणि विंचू त्या साधूला नांगी मारतोय, साधू वेदनेनं विव्हळतोय, तरीही साधू पुन्हा पुन्हा त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय... शिकाऱ्यास हे सर्व पाहून राहवलं नाही. त्यानं साधूला सांगितलं, 'महाराज स्पष्ट बोलतोय म्हणून क्षमा असावी, परंतु, तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करता आणि तो विंचू तुमचे उपकार विसरून तुम्हाला एक सारखा नांगी मारतोय, तुम्हाला वेदना होतात. तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचं सोडून का देत नाहीत, त्याला बुडायाचं असेल तर बुडू द्या, मरू द्या नं!'
शिकाऱ्याचा हा शहाणपणाचा सल्ला ऐकून साधूला हसू आलं, त्यानं शिकाऱ्यास सांगितलं, 'माझ्या मुला, तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही. पण हे बघ, विंचू मला नांगी मारतोय हे खरं आहे, परंतु, तो द्वेषानं किंवा दुष्ट हेतूनं मला नांगी मारत नाही. जसा पाण्याचा स्वभाव मला भिजविण्याचा आहे, तसा विंचवाचा स्वभाव नांगी मारण्याचा आहे. मी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे ते त्याला समजत नाही. ते त्याच्या बुद्धीला उमगण्याच्या पलीकडचं आहे. परंतु जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा माझा स्वभावधर्म त्याला वाचविण्याचा आहे. जर तो त्याचा स्वभावधर्म बदलू शकत नसेल तर मी तरी माझा का बदलावा? माझा धर्म, प्रत्येक प्राण्याला, मग तो मनुष्य असो की जंगली प्राणी, वाचविण्याचा आहे, या छोट्या विंचवाच्या वागण्यामुळे तो का बदलू?'
आपण जगात वावरताना आपणास अनेकांच्या विचित्र वागण्याला तोंड द्यावं लागतं. काही आपल्याला मानसिक इजा करत असतात, काही शारीरिक. काही आपला अपमान करीत असतात, आपण साध्य केलेलं यश काहीजण जाणीवपूर्वक हिरावून घेतात. काहीवेळा आपले सहकारी आपल्या कल्पना चोरतात किंवा आपल्याविरुद्ध बॉसकडे कागाळ्या करतात. काही वेळा आपलेच मित्र, नातेवाईक सहकारी अचानक विश्वासघात करतात. कधी कधी आपल्या पाठीमागे आपल्या विरोधात बोलत राहतात.
हळुहळू आपणास असं दिसतं की, आपण स्वत:च रागानं किंवा वेदनेनं एखादी कृती करीत असतो, आपले शब्द वा विचार व्यक्त करीत असतो. कधकधी आपण सूडबुद्धीनं वागण्याचा विचार करतो. आपल्यावर नकळत नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो आणि आपण स्वत:चं नुकसान करून घेतो. मनात आणि हृदयात वाईट विचार आणून स्वत:ला इजा करून घेतो. कधी काहीजण कटकारस्थान करून आपल्या यशावर पाणी फेरतात.
आपला धर्म, दया दाखविण्याचा, प्रामाणिकपणे वागण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, इतरांची काळजी घेण्याचा आहे. इतर काही अज्ञानापोटी, असमंजसपणे, द्वेषानं, स्वाथीर्पणानं, वैरभावानं वागतात. परंतु, त्यांच्या वाईट वागण्याचा, अज्ञानाचा, त्यांच्या सवयीचा, लोभी वृत्तीचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे.
आंतरजालावरून साभार
एक दिवस एक साधू नदीवर स्नानास गेला होता. स्नान घेत असताना त्यास एक विंचू पाण्यात पडून गटांगळ्या खाताना दिसला. त्या विंचवास पोहता येत नव्हतं. जीव वाचविण्यासाठी तो करीत असलेली केविलवाणी धडपड पाहून साधूचं मन दवलं. त्याच्या मनात विचार आला, जर आपण विंचवास वाचविले नाही, तर तो नक्कीच बुडणार. त्यामुळे साधूनं त्या विंचवास अत्यंत काळजीपूर्वक उचलून पाण्याबाहेर काढलं आणि नदीच्या काठावर नेऊन खाली जमिनीवर सोडणार तोच त्या विंचवानं साधूच्या बोटाला नांगी मारली. साधूला असह्य वेदना झाल्या, त्यानं एकदम हात झटकला, विंचू जमिनीवर पडला. साधूनं सुटकेचा नि:श्वास सोडला आणि पाण्यात शिरून स्नान घेऊ लागला, थोड्या वेळानं त्याचं लक्ष पुन्हा विंचूच्या दिशेनं गेलं, त्याला दिसलं की, विंचू जमिनीवरून परत एकदा नदीच्या दिशेनं जाऊन पाण्यात पडून धडपडू लागला आहे. साधूला पुन्हा त्याची कीव आली. त्यानं त्यास पुन्हा उचलून पाण्याबाहेर काढलं, आणि पुन्हा तेच, विंचवानं साधूच्या हाताला नांगी मारली... असं हे नाट्य काही मिनिटं चालू होतं.
पाण्यावर येणारी शिकार टिपण्यासाठी तेथून जवळच झाडावर दबा धरून बसलेला शिकारी हे सर्व नाट्य पाहत होता. साधू त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय आणि विंचू त्या साधूला नांगी मारतोय, साधू वेदनेनं विव्हळतोय, तरीही साधू पुन्हा पुन्हा त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय... शिकाऱ्यास हे सर्व पाहून राहवलं नाही. त्यानं साधूला सांगितलं, 'महाराज स्पष्ट बोलतोय म्हणून क्षमा असावी, परंतु, तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करता आणि तो विंचू तुमचे उपकार विसरून तुम्हाला एक सारखा नांगी मारतोय, तुम्हाला वेदना होतात. तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचं सोडून का देत नाहीत, त्याला बुडायाचं असेल तर बुडू द्या, मरू द्या नं!'
शिकाऱ्याचा हा शहाणपणाचा सल्ला ऐकून साधूला हसू आलं, त्यानं शिकाऱ्यास सांगितलं, 'माझ्या मुला, तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही. पण हे बघ, विंचू मला नांगी मारतोय हे खरं आहे, परंतु, तो द्वेषानं किंवा दुष्ट हेतूनं मला नांगी मारत नाही. जसा पाण्याचा स्वभाव मला भिजविण्याचा आहे, तसा विंचवाचा स्वभाव नांगी मारण्याचा आहे. मी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे ते त्याला समजत नाही. ते त्याच्या बुद्धीला उमगण्याच्या पलीकडचं आहे. परंतु जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा माझा स्वभावधर्म त्याला वाचविण्याचा आहे. जर तो त्याचा स्वभावधर्म बदलू शकत नसेल तर मी तरी माझा का बदलावा? माझा धर्म, प्रत्येक प्राण्याला, मग तो मनुष्य असो की जंगली प्राणी, वाचविण्याचा आहे, या छोट्या विंचवाच्या वागण्यामुळे तो का बदलू?'
आपण जगात वावरताना आपणास अनेकांच्या विचित्र वागण्याला तोंड द्यावं लागतं. काही आपल्याला मानसिक इजा करत असतात, काही शारीरिक. काही आपला अपमान करीत असतात, आपण साध्य केलेलं यश काहीजण जाणीवपूर्वक हिरावून घेतात. काहीवेळा आपले सहकारी आपल्या कल्पना चोरतात किंवा आपल्याविरुद्ध बॉसकडे कागाळ्या करतात. काही वेळा आपलेच मित्र, नातेवाईक सहकारी अचानक विश्वासघात करतात. कधी कधी आपल्या पाठीमागे आपल्या विरोधात बोलत राहतात.
हळुहळू आपणास असं दिसतं की, आपण स्वत:च रागानं किंवा वेदनेनं एखादी कृती करीत असतो, आपले शब्द वा विचार व्यक्त करीत असतो. कधकधी आपण सूडबुद्धीनं वागण्याचा विचार करतो. आपल्यावर नकळत नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो आणि आपण स्वत:चं नुकसान करून घेतो. मनात आणि हृदयात वाईट विचार आणून स्वत:ला इजा करून घेतो. कधी काहीजण कटकारस्थान करून आपल्या यशावर पाणी फेरतात.
आपला धर्म, दया दाखविण्याचा, प्रामाणिकपणे वागण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, इतरांची काळजी घेण्याचा आहे. इतर काही अज्ञानापोटी, असमंजसपणे, द्वेषानं, स्वाथीर्पणानं, वैरभावानं वागतात. परंतु, त्यांच्या वाईट वागण्याचा, अज्ञानाचा, त्यांच्या सवयीचा, लोभी वृत्तीचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे.
आंतरजालावरून साभार
No comments:
Post a Comment