Wednesday, 18 January 2012

वा रे वा मराठी हुशारी...!!!



एकदा बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!

तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!

त्यातला एक असतो आपला “प्रमोद ”

बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेच २००० लोक कमी होतात...!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!


प्रमोद (मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत नाही त्यांनी बाहेर जावे...!!!


मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

आणि शेवटी प्रमोद आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!

बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!


शांतपणे प्रमोद वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!

प्रमोद :कुठून आला आहेस...???

तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
.
.
“महाराष्ट्रातून”


नेटवरून साभार

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

 
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

कोळ्यांची मुम्बादेवी, हौसेने नटली,

बघता बघता इकडे, मुंबा नगरी वसली.

मराठमोळी माणसांची, मराठमोळी वस्ती.

कोणाची नाही फ़िकर, कोणाची नाही धास्ती.

मुंबईच्या नावाने, उजळला मराठी माथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या सुखापासुन, लांब तिथे दूर.

बिहार आणि यूपी मध्ये, होता भ्रष्टासुर.

त्यांच्या लोकांचे होते, जेवणाचे हाल.

सर्वांनी साद घातली, "बंबई हमें पाल".

मराठीने त्यांना दिला आपला अर्धा वाटा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईमध्ये हळुहळु, झाली भरभराट,

सर्वांना दिसे इथे, भाग्याची पहाट.

देशाच्या सर्व भागांतून, लोक इथे आले.

मुंबईने सर्वांना आपलंसं केले.

सारी तिची लेकरे, सर्वांची ती माता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

टॅक्सीवाला सरदारजी, कलईवाला खान.

मुम्बईत पहायला मिळे, सगळा हिंदुस्तान.

मुंबईने सर्वांना, घेतलं आपल्या कुशीत,

घर दिलं, माया दिली, सगळे होते खुशीत.

मुंबईचे गुण गायी, सर्व येता जाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आधी आधी वाटले, सारे मुंबईकर.

हळुहळु पाहुणा बसला छातीवर.

जिथे हवं थूंका, जसं हवं रहा,

मुंबई गेली खड्ड्यात, पैसा तेवढा पहा.

"यूपी बिहार के लियेही बंबई बना था."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

बघता बघता मुंबईत, वाढु लागली गर्दी.

"गर्दीने तो बम्बई की, हालत पतली कर दी."

मुंबईत सगळीकडनं, माणसांचा लोंढा आला.

मुंबईतला मराठी, दिसेनासा झाला.

"तुम्ही कोण? मराठी? अंबरनाथला राहता?"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईतुन मराठी, झाली कुठे गुल?

मराठींनाच दाखवी बोर्ड "हाउस फ़ुल".

जे जे आले मुंबईला कामधन्द्यासाठी.

सीमापार केली त्यांनी माय मराठी.

मराठी मातीमध्ये, बाकीच्यांच्या बाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

म्हणायला मुंबई होती आर्थिक राजधानी.

पण तिची झोळी, सदैव रिकामी.

साद घाले दिल्लीला, बनवुन द्या हो रस्ते.

दिल्ली म्हणे नाक उडवुन, "माफ़ करो, नमस्ते.

सारा धन हमारा, पहलेही कहा था!"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या जमीनीवर, गर्दी गेली वाढत.

बघवेना फुगलेल्या मुंबईची हालत.

जागोजागी फ़ेरीवाले, पावलोपावली घाण.

एकेकाळी होती जिथे सोन्याची खाण.

ज्यांना दिली माया, त्यांच्याच खाई लाथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

अमराठी वोटेबँकने रोवले इथे पाय.

तेव्हा त्यांच्या नेत्यांना, सुचला एक उपाय.

"चला आता मुंबईतुन आपले खिसे भरु.

मुंबईचे सुद्धा आता, यूपी बिहार करु.

मुम्बाईच्या जमीनीला नासवुया आता."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

दिवसेंदिवस वाढत गेली, बाहेरच्यांची नशा.

बघता बघता मुंबईची, झाली दुर्दशा.

"अश्रू कोणी बघु नये, डोळे तिचे झाका.

दु:ख तिने सांगु नये, तोंड शिवून टाका."

चालु राहिला अखंडीत, लुटण्याचा सपाटा.

एक होती मुंबई. तिची ऐका गाथा.

मुंबईने जेव्हा आपली, व्यथा सांगितली,

मिडियाने देशामध्ये, जी आग ओतली.

आपल्या जागी मराठीच, झाला बंडखोर.

शिवरायांच्या जमिनीवर, मराठीच चोर?

मुंबईची कैफ़ियत, आता पुढे वाचा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आजही मराठी भाकर अर्धी अर्धी खाईल.

तुमच्या बरोबर मुंबईच्या, पदराखाली राहील.

पण आदर तिचा केला नाहीत, तर याद राखा!

सपाटुन पडेल, मराठी तडाखा.

घाईघाईत पकडायच्या, घराकडच्या वाटा.

एक होती मुंबई, तीची ऐका गाथा.

काय म्हणता नितिशजी, पासवान आणि लालु?

मराठींच्या व्यथेवर, राजकारण चालु?

बिहारमध्ये लावली तशी आग नका लाऊ.

संतांच्या महाराष्ट्राचा, अंत नका पाहु.

तुका म्हणे "नाठाळाच्या काठी हाणु माथा."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.


-------नेटवरून साभार

Friday, 6 January 2012

जागो रे!

डोळ्यात अंजन घालणाऱ्या 'टाटा टी'च्या या जाहिराती गदागदा हलवून जागं करतात. पण आपणच झोपलेल्याचं सोंग घेतलंय बहुतेक.

'हर सुबह सिर्फ उठो मत, जागो रे!' निवडणुका आल्या की 'टाटा टी'च्या अॅड्स टीव्हीवर दिसू लागतात. डोळे उघडायला लावणारी ही कॅचलाइन. आधी मतं मागणाऱ्या पुढाऱ्याचा इंटरव्यू घेणारा तरुण यात दिसला. नंतर मतदानाच्या दिवशी सिनेमा बघणाऱ्यांना जागं करणारी अॅड आली.

आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नवी जाहिरात आलीय. 'खिलाना बंद, पिलाना शुरू'. यात वेगवेगळ्या प्रकारे पैसे खाणारे दिसतात. पुढे 'लेकिन आपको पता हैं, ये लोग इतना खाते क्यों हैं?', हा प्रश्न विचारला जातो. उत्तर डोळ्यांत अंजन घालणारं, 'क्योंकि हम खिलाते है'. हे ऐकताना अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, हे गांधीजींचं वाक्य आठवतं. गांधीजींनी प्रत्येक गोष्टीला मूळापर्यंत खणून समजून घेतलं होतं. त्यामुळे ते एकदम वेगळ्या चौकटीतून जगाकडे बघू शकले. जागे होऊन.

पण आपण झोपलोय. खरं तर झोपेचं सोंग घेऊन पडलोय. भ्रष्टाचार आपण स्वीकारलाय. त्याच्याशिवाय आपली कामं होणारच नाहीत, असं आपल्याला ठामपणे वाटतं. एकदम क्रूसेडर बनावंच, असं नाही. पण शेकडो नव्वद कामं भ्रष्टाचाराशिवाय होऊ शकतात. अनेकदा आपणच उशीर करतो. फॉलोअपला वेळ नसतो. सिस्टम, नियम समजून घेतलेले नसतात. त्यातून आपण भ्रष्टाचाराचा शॉर्ट कट शोधतो. बथ्थड नोकरशाह पैशाच्या वजनाशिवाय हलायला तयार नसतात, हे शंभर टक्के खरं. पण अनेकदा आपणही दोषी असतो. ठरवलं तर आपण त्याला आळा घालू शकतो. त्यांना पैसे खायच्या सवयी आपणच लावतो, आपणच त्या सोडवूही शकतो. खरं तर पैशानंही जी कामं होत नाहीत. ती प्रसन्न वागणं, प्रेमळ शब्द आणि समोरच्यातल्या माणूसपणावर विश्वास असेल, तर होऊ शकतात.

मुळात फक्त पैशांची देवाणघेवाण म्हणजेच भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार चहाच्या पेल्यापासून सुरू होतो आणि बाईच्या शरीरापर्यंत पोहोचतो, असं म्हणतात. त्याच्याही अलीकडे पलीकडे खूप भ्रष्टाचार आहे. आपण पूर्ण पगार घेतो, पण आठ तास नेमलेलं काम करत नाही. हा भ्रष्टाचार नाही का? सार्वजनिक गणपती बघायला वशिला लावून घुसतो, हा भ्रष्टाचार नाही का? मूळ पुस्तकातून अभ्यास न करता गाइड वाचून पास होतो, हा पण भ्रष्टाचारच नाही का? अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी. चिमूटभर खाल्लं, तरी त्याला शेण खाणंच म्हणतात. पण या सगळ्यातून आपला फायदा होत असतो. वेळ वाचतो, पैसे वाचतो. त्यातच आपण खूश असतो. मात्र यातून आपण नकळत आतल्या प्रामाणिकपणाच्या आगीवर राख टाकत असतो. हळूहळू ती आग विझत जाते आणि आपण कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात नडायचा अधिकारच गमावून बसतो. आपल्या नकळत. अशा वेळेस आपण फार तर उठू शकतो. जागू शकत नाही.

सिर्फ उठो मत जागो, ही लाइन 'उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरान्निबोधत' या वेदवचनावरून सूचलीय, हे उघड आहे. उठा, जागे व्हा, ध्येय मिळेपर्यंत थांबू नका, असं हे वचन सांगतं. खरा बोध मिळवण्यासाठी जागं होणं गरजेचं आहे. जागं होणं दूरच, आपण उठायला तरी तयार आहोत का? की असंच सोंग घेऊन झोपून राहणार? आता तरी उठूया ना!

- सचिन परब

एक उंदीर

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........
"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,...
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,
"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............
त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......
"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........
हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"
सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भांग पितो तेव्हा असाच बोलतो..........

प्रेमात पडलं की

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारख ंच वागतात...

... यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं...

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधी ल आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात...

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात....

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात...

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात

Sunday, 1 January 2012

जावे कॉमर्सच्या गावा


प्रगती फास्ट टीम

तुमचं स्पेशलायझेशन कॉमर्समध्ये असेल, तर तुम्हाला फायनान्स क्षेत्रात भरपूर संधी आहेत. अनुभवी लोकांसह अगदी फ्रेशर्सनाही करिअरचे खूप मार्ग मोकळे आहेत. या क्षेत्रातल्या वाढत्या संधींचा घेतलेला वेध...

सामान्य माणसाच्या दृष्टीने फायनान्स म्हणजे पैशाचं व्यवस्थापन आणि अकाउण्टिंग म्हणजे व्यवहारांची योग्य पद्धतीने ठेवलेली नोंद. परंतु, यात विविध प्रकारची काम आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्यं आवश्यक असतात. पूवीर्च्या काळात सध्यासारखी व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात अकाउण्टन्सी किंवा फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज लागत नव्हती. मात्र, बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक संस्थांना अशा तज्ज्ञांची सेवा घेण्याची गरज भासू लागली. सध्याच्या काळात फायनान्स आणि अकाउण्टिंग या शाखा कंपनीच्या लाइफलाइन बनल्या आहेत. म्हणूनच कंपन्याही तज्ज्ञ आणि कुशल व्यक्तींचीच निवड करतात.

संधी कोणत्या?

बीकॉम किंवा बीबीएच्या पदवीनंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री करू शकता. यात एमकॉम, एमबीए फायनान्समध्ये पीजीडीएम, कॅपिटल माकेर्टमधील कोसेर्स, वेल्थ मॅनेजमेंट, इन्शुरन्स, रिस्क मॅनेजमेंट, सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, सीएफपी, सीएफए असे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत.

चार्टर्ड अकाउण्टंट (सीए)

सीए हे खूप आव्हानात्मक आणि तुमच्या क्षमतांना वाव देणारे असे करिअर आहे. अकाउण्टन्सीचे नियमन करणारी प्रत्येक देशाची स्वतंत्र संस्था यासाठीचे नियम ठरवते. चार्टर्ड अकाउण्टन्सी हा अकाउण्टन्सीमधील प्रोफेशनल कोर्स भारतात १९४९ मध्ये सुरू झाला. हा कोर्स चार्टर्ड अकाउण्टंट अॅक्टनुसार चालविण्यात येतो. हा अभ्यासक्रम म्हणजे थिअरी आणि पॅक्टिकलचे मिश्रण आहे. अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण एकदमच (पॅरलल) घ्यावे लागते. तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोफेशनल अकाउण्टंट बनण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, कौशल्यं आत्मसात करता येतात आणि त्यांच्या क्षमतांचाही विकास होतो.

आयसीडब्ल्यूए

कोणतीही संस्था टिकून राहण्यासाठी अथवा सुरळितपणे चालण्यासाठी कॉस्ट मॅनेजमेण्ट महत्त्वाची असते. जागतिक स्तरावरील वाढत्या स्पधेर्मुळे कंपन्यांवर कमीत कमी दरात सेवा देण्यासाठी दबाव येत आहे. कॉस्ट अकाउण्टन्सीच्या कोर्सला बारावी किंवा पदवीनंतर (कॉमर्सला प्राधान्य) प्रवेश घेता येतो. इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अँड र्वक्स अकौंटंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूए) ही संस्था कॉस्ट अकाउण्टन्सीचे कोसेर्स चालवते.

सीएफए

सीएफए या अभ्यासक्रमात अकाउण्ट्सची मूलभूत तत्वे, व्यवसायांच्या विविध प्रकारांची माहिती, वित्तीय धोरणे आदी गोष्टींची इत्थंभूत माहिती दिली जाते. सीएफए अभ्यासक्रमासाठी पदवी (कॉमर्स विथ मॅथ्सला प्राधान्य) ही किमान पात्रता आहे.

एमबीए (फायनान्स)

एमबीए (फायनान्स) ही एक सर्वसमावेशक पदवी आहे. यात नेहमीच्या वित्तीय व्यवस्थापनासोबतच गुंतवणूक, शेअरमधील गुंतवणूक आणि ब्रोकरेज, अर्थशास्त्र, माकेर्ट अॅनलिसिस आणि व्यवस्थापनाशी संबंधित अन्य गोष्टी शिकविल्या जातात. यासाठी तुम्ही किमान पदवीधर असणे गरजेचं आहे.

एनएसई सटिर्फिकेशन

ज्यांना शेअर (स्टॉक) ट्रेडिंगची माहिती आहे, अशांसाठी एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) सटिर्फिकेशन हा चांगला पर्याय ठरतो. यामध्ये १०० तासांचं प्रशिक्षण आणि २० तासांचं प्रत्यक्ष ट्रेडिंगचं प्रशिक्षण याचा समावेश आहे.

सीएफपी

बँकांमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून; तसेच वेल्थ मॅनेजमेण्ट कंपन्यांमध्ये, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा अन्य वित्तीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती सटिर्फाइड फायनान्शियल प्लॅनिंग प्रोगॅम (सीएफपी) हा अभ्यासक्रम करू शकतात. भारतासारख्या देशात ५० हजारांहून अधिक सीएफपींची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १३०० सीएफपीच उपलब्ध आहेत. सीएफपी या सटिर्फिकेटला जगातल्या २३ देशांमध्ये मान्यता आहे. फायनान्शिअल प्लॅनिंग स्टॅण्डर्ड्स ऑफ इंडिया (एफपीएसबी) तफेर् हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. हा अभ्यासक्रम १६५ ते १८० तासांचा असून, एफपीएसबीच्या एज्युकेशन पार्टनर्समार्फत शिकविला जातो. सीएफपी उमेदवाराला अन्य व्यक्तींपेक्षा ३० टक्के जास्त पगार मिळतो; तसेच काही कंपन्यांकडून नोकरीसाठी प्राधान्यही दिले जाते.

काय दिवस होते ते...!

कधी कधी मला माझ्या जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... तुम्हाला आठवतयं:

१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवाणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहाण लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...

..... काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

................
.........................
................................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की... :)
 आंतरजालावरून साभार

आयुष्य जास्त सुंदर वाटत..


गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

-अनामिक